नव्या वाटा नव्या आशा
नवा डाव मी मांडला...
चांदण्यांना घेऊन आज
चंद्र आभाळभर सांडला...
नेहमी वाटायचं मला तुझ्या सोबत
समुद्र किनारी बसून ...
बुडणारा सूर्य बघावा
त्या सुंदरश्या कातर वेळी
काहीच न बोलताही ...
तुझ्या माझ्यात संवाद घडावा
मनाच्या तळाशी..खोल गहिऱ्या पाण्यात
तुझ्या आठवणींचे क्षण...विसावलेले
छेडता तारा मनाच्या कुणी
मला छळावयास.. सरावलेले
तू जाताना दूर.....
मागे वळून पाहू नकोस
सावरलेल्या मनाला पुन्हा
आवरायला लावू नकोस
कितीदा तुझ्या आठवणीत
तासन तास राहिले
तू समोर दिसलास
जेव्हा मी आरशात पाहिले
रात्र इतकी गर्द तरी...
तू इतका स्पष्ट कसा दिसतोस
रोज असाच येऊन मला
आठवणींच्या दरीत लोटतोस
तुझे नसणेही आता
मानले असल्यासारखे
खोल हृदयात आपले
गाव वसल्यासारखे...
खुपदा मला नाही जमलं
तुझ्या जवळ राहणं....
सूर्य बुडून गेल्यावर
मग चांदण्यात न्हाणं...
तू रागावलास की
सारं जग विस्कटतं....
माझ्यापुरतं सावरून पुन्हा
तुझ्याभोवती भरकटतं....
तुझ्या आठवणीत कुढत राहणं
मला आता जमेनासं झालंय
मरण येत नाही पण
आता जगणं हि झेपेनासं झालंय
जपून ठेव आपले प्रेम
जपून ठेव त्या आठवणी..
भेटू पुन्हा आयुष्यात
कुठल्या तरी कारणांनी..